श्री धावीर मंदिर ट्रस्ट
श्री धावीर देवस्थान गॅलरी
श्री धावीर मंदिर ट्रस्ट
आमचा इतिहास
महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्या मुंबई पासून केवळ संख्याशे किलोमिटर अंतरावर शिवरायांच्या रायगड जिल्हयात ‘रोहा’ हे निसर्गसुंदर गाय बसलेले आहे. उत्तरेला अवचितगड आणि दक्षीणेला कळसगीरीचा डोंगर आणि बारमाही वाहणारी कुंडलिका या सा-यांच्या मधे बसलेलं टुमदार घरांचे आणि छोटया मोठ्या हिरव्या झाडांचे रोहा हे गाव. या सा-या गोष्टी रोह्याची सुरेख नैसर्गिक रचना डोळयासमोर उभी करतात. ह्या अशा निसर्गसंपन्न रोह्यात दोन नररत्न जन्माला आली त्यांनी रोह्याच्या कितीत भर घातली. रोहयाच्या मातीत सुगंध भरला.
कुलं पवित्र, जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच येन त्यातले एक म्हणजे भारताच्या अर्थकारणाला स्वताच्या सत्यशीलतेने वळण लावणारे भारताचे पहिले अर्थमंत्री व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डा. चिंतामणराव देशमुख आणि दुसरे म्हणजे भारताच्या नव्हे तर विश्वाच्या अध्यात्मिक क्षेत्राला मार्गदर्शन करणारे मानव्याचा उद्धार करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनिय पांडूरंग शास्त्री आठवले.




